॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २५ मना वीट मानूं नको बोलण्याचा

मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥

॥ २५ ॥

मनाचे श्लोक २५ अर्थ — मराठी

हे मना, रामनाम बोलण्याचा कंटाळा करू नकोस; पुन्हा पुढे राम कोठून जोडला जाईल? सुखाची घडी लोटली की तेवढेच सुख; पुढे सर्व निघून जाईल, काहीही राहणार नाही.

Manache Shlok 25 Meaning — English

O mind, do not tire of speaking Rama's name — where will you find Rama again later? Only the passing moment holds its joy; afterwards all slips away and nothing remains.